पोस्ट्स

ऑगस्ट, २०१५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोठेही जा पदरी निराशा आणि असुरक्षितता...

इमेज
भरमसाठ वाढलेली लोकसंख्या आणि सर्व यंत्रणावर पडत चाललेला भार याबाबत मानव आजही गंभिर नाही.हा पराकोटीचा गंभिरपणा म्हणावा लागेल.आज माणूस समाधान नाही कारण त्याचे जीवनविषयक विचार बदलले असून तो तितकासा सूचक विचाराचा प्राणी राहिलेला नाही.आज कोठेही गेला तरी त्याला एकांत लाभत नाही.म्हणून तो आत्मिक होत नाही.स्वत:कडे पाहण्यास त्याला वेळ नाही.हे असे का व्हावे.याचे कारण लोकसंख्या आहे.जिकडे पाहावे तिकडे आज बेसुमार आणी बेजबाबदार लोकांचे अर्णव पाहावयास मिळतात.यात भर मग कोणतेही काम व्यवस्थित होत नाही.हे जर असेच वाढत राहिले तर मानव जातीचे अस्तित्व कठिण आहे.कारण माणूस आजही याबाबत जागरुक नाही. भविष्यात तुम्हालाही कधी ताण तणाव जाणवत असेल तर त्याचे कारण भरमसाठ वाढलेली लोकसंख्या आहे की नाही याचा शोध घ्या.