जाणून घ्या तुमची राजकीय विचारधारा नेमकी कोणती ?

जाणून घ्या तुमची राजकीय विचारधारा नेमकी कोणती ? राजकाराण हा एक असा विषय आहे की,प्रत्येकाची त्याबद्दल मतं असतात.आणि ती असावयास हवी.भारतात तर राजकारण हा विषय अधिक चघळला जातो.रिकामटेकड्या लोकांची संख्या अधिक व बेरोजगार तरुणांचा आधारस्तंभ म्हणून आजचे राजकारणी या तरुणांना हाताळताना दिसतात.अशा या राजकारणाबद्दल तावातावाने मतं मांड्ली जातात.आपण अमुक एका विचारसरणीचे आहोत,तमुक पक्षालाच मत देणार,तमुकच नेता लय भारी ,असे समीकरण अतिशय विश्वासाने मांड्ली जातात.त्यात डावं-उजवही असतं. पण हे डावं व उजवं काय असतं.हे समजून घेणं अत्यंत महत्वाचं असतं.त्याचा धोरणांशी व विचाराशी काय संबंध असतो.खरे तर राजकीय विचार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचे असते.जेंव्हा राजकारणातून आदर्श विचारसरणीचा –हास होतो.तंव्हा आपली मते पक्की असणं महत्वाचे असते. भारतात लोकशाहीचा काहीही उपयोग नाही,इथे दंडेलशाही किंवा सरळ लष्काराची राजवटच हवी असं काहीजण म्हणतात.पण लष्करी किंवा हुकुमशाही राजवटीचा सामाजिक,आर्थिक व राजकीय परिणाम काय होईल.,हे मत व्यक्त करना-यास माहित नसत. अशा विचाराला भारतात फ़ार उत आहे.कोण कधी कसा काय बोलेल याच...