महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली.



महाराष्ट्रात पुरवठा विभागाची प्रचंड अनागॊंदी.आणि ग्राहक वितरण प्रणाली.
अन्न आणि नागरी पुरवठा विभागाचा अनागोंदीपणा आता जनतेला नवीन नाही.तरीपण यात म्हणाव्या तेवढ्या सुधारणा झाल्या पाहिजेत या मानसिकतेचे प्रशासन नाही.हे एक न सुटणारे कोडे आहे.जनतेच्या हक्काचे केरोसीन व धान्य त्यांना न देता प्रशासनातील अधिकारी आणि अर्धघाऊक व किरकोळ विक्रेते पोसण्याचे काम केले जाते.यावर तात्पुरता उपाय केला आहे असे दाखवण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागाने ग्राहक वितरण प्रणाली कार्यन्वित केली आहे.याचा वापर सामान्य मानसाला कसा काय करता येईल याचा विचार अद्द्याप प्रशासनाने केला नाही. जे लोक ओनलाईन तक्रार नोंदवतात त्याच्या तक्रारीचा परिणाम काय होतो.हे पाहण्याचे परिमान प्रशासनाकडे नाही.
ग्रामीण व आदिवासी विभागातील लोकांना आजही वेळेवर धान्य मिळत नाही.साखर तर नाहीच नाही.ही यंत्रणा वाटप केल्याचा नुसता देखावा करते वाटप मात्र काही प्रमाणातच होते. दुष्काळी भागातील लोकांना आधार म्हणून उन्हाळ्यात राज्यातील काही बाधित जिल्हे यांच्यासाठी धान्य पुरवठा योजना राबवली पण याचा कोणताच ताळमेळ प्रशासनाने लागू दिला नाही.सरळ हे धान्य काळ्या बाजारात विकले गेले.जनतेने आता याबाबत प्रशासनाला जाब विचारला पाहिजे.माहिती अधिकाराचा वापर करुन ही यंत्रणा ताळ्यावर आणने गरजेचे आहे.कार्यकर्त्यांनी सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी झटले पाहिजे.

*केरोसीन शासकीय दराप्रमाणे विकले जात नाही.कित्येक महामार्गावर दुकाने थाटुन मोठ्या वाहनात हे केरोसीन भरले जाते. तेही ४० रु.प्रती लिटर प्रमाणे.
*राज्यात आजही शिधावाटप पत्रिका यांचा ताळमेळ नाही. बनावट शिधापत्रिका मोठ्या प्रमाणात काढल्या गेल्या आहेत.ज्या शिधापत्रिका चे क्रमांक कोठेही नाहीत. ते चोरीच्या मार्गाने दिले आहेत.
*भरड धान्य योजना कोणाच्या घशात उतरवली जाते.याचा अजूनही पत्ता नाही.
*ए.पी.एल.व. बी.पी.एल.यांच्यात कसलाही संबंध नाही.
*साखरेचे नियतन प्रत्येक महिन्यास जाहीर होते ,पण त्याचे वितरन कोठे होते याचा काहीच पत्ता नाही.ग्रामीण भागातील लोक सणाच्या वेळेस आतुरतेने वाट पाहतात पण ही साखर त्यांच्या भेटीला कधीच येत नाही.
असा हा महाराष्ट्रातील अन्न व नागरी पुरवठा विभाग आहे. तरीपण अन्न व नागरी पुरवठा विभाग या प्रणालीवर लोकांनी तक्रारी करण्यास हरकत नाही.आपले सरकार या पोर्टलवरही तक्रार दाखल करता येईल.ग्राहक मंचाकडेही तक्रार दाखल करता येईल.चला आता कामाला लागा अन्यथा आपल्या हक्काची कोणतीच् योजना ही यंत्रना आपल्या पदरात पडू देनार नाही.हे तितकेच सत्य आहे.

अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटवर तक्रार करण्या़साठी येथे क्लिक करा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षक,शिक्षण,आणि समाजव्यवस्था याचा परस्परसम्बद्भ.

ICT VIP QUESTION FOR COMPUTER EXPERT AND STUDENTS PART-02